author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

वीज वापरात महाराष्ट्रातील शेती दुसऱ्या क्रमांकावर

शेतीत पाणी पुरवण्यासाठी- ठिबक सिंचन चालवण्यासाठी, विहिरीतील मोटार पंपासाठी आणि धान्य-भाजीपाल्याची प्रक्रिया करण्यासाठी वीजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात वीज ही शेतीच्या उत्पादनक्षमतेशी थेट जोडलेली आहे. म्हणूनच शेतीतील वीज वापर किती आहे, त्यातील आव्हाने कोणती आहेत आणि पुढे काय दिशा घ्यायला हवी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वीजविक्री आणि कृषी वीज वापर महावितरणच्या […]

खपली गहू: खरं काय, मिथक काय?

आजकाल बाजारात खपली गहू (Emmer Wheat / Triticum dicoccon) हे नाव खूप गाजत आहे. आरोग्याविषयी जागरूक लोक याकडे आकर्षित होत आहेत. “सुपरफूड”, “डायबेटिकसाठी आदर्श धान्य”, “प्राचीन काळापासून वापरले जाणारे चमत्कारिक धान्य” असे अनेक दावे जाहिरातींमधून ऐकायला मिळतात. किंमतही सामान्य गव्हापेक्षा अनेक पटीने जास्त असते. मात्र खपली गहू (Emmer Wheat) म्हणजे नक्की काय? त्याचा इतिहास, जैविक […]

ग्रामीण भारतात अज़ीम प्रेमजीचं योगदान

भारतातील ग्रामीण समाज अजूनही अनेक मूलभूत आव्हानांशी झगडतो आहे – अपुरं शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि असुरक्षित उत्पन्न. सरकारी योजना व धोरणं मदत करतातच, पण त्यांचा परिणाम अनेकदा धीमा किंवा अपुरा ठरतो. अशा परिस्थितीत खाजगी परोपकारी उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात. अज़ीम प्रेमजी (Azim Premji), IT उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि विप्रो (Wipro) चे संस्थापक, […]

दुष्काळ म्हणजे काय, कोण ठरवतं आणि त्याचे निकष

भारतामध्ये दुष्काळ ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही; ती सामाजिक व आर्थिक परिणाम घडवणारी गंभीर परिस्थिती आहे. दुष्काळ आल्यास शेतकऱ्यांचं जीवन, पिकांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज भासते. म्हणूनच दुष्काळ औपचारिकपणे जाहीर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यानंतरच मदत आणि दिलासा योजना कार्यान्वित होतात. त्यामुळे दुष्काळाची व्याख्या, […]

भारतात अजूनही इथेनॉल मुक्त पेट्रोल मिळतं का?

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आणि ग्राहकांमध्ये एकच चर्चा आहे — E20 पेट्रोल आलंय, पण यामुळे माझ्या गाडीचं माईलेज (Mileage) कमी होईल का? जुन्या इंजिनवर काही दुष्परिणाम तर नाहीत ना? भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (Ethanol Blending Programme (EBP) मुळे हा प्रश्न अगदी घराघरात पोहोचला आहे. आधीच्या लेखात आपण भारताची इथेनॉल (Ethanol) उत्पादनातील वाटचाल, जागतिक […]

योग्य फार्म स्टे कसा निवडावा?

शहरातील दगदग, गोंगाट आणि धावपळीच्या जीवनातून जेव्हा आपण थोड्या वेळासाठी सुटका शोधतो, तेव्हा मनाला एकच हवं असतं – शांत निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवणं. अशा वेळी फार्म स्टे (Farm Stay) हा उत्तम पर्याय ठरतो. फार्म स्टे  म्हणजे शेतात राहण्याची केवळ व्यवस्था नाही, तर शेती, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव आहे. पायाखाली ओलसर मातीचा स्पर्श, सकाळी […]

भारतातील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचा बाजार आणि संधी

भारतात पाळीव प्राण्यांची संख्या जलद गतीने वाढते आहे. विशेषतः कुत्र्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांच्यासाठी पौष्टिक व दर्जेदार खाद्य (Dog food) घेण्याकडे मालकांचा कल वाढला आहे. पूर्वी उरलेलं अन्न देण्याची पद्धत होती, पण आता भारतातील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचा बाजार जलद वाढत असल्यामुळे आरोग्याला पूरक, सेंद्रिय (Organic food) आणि संतुलित आहार निवडणारे ग्राहक अधिकाधिक दिसू लागले आहेत. […]

डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या: टिकाऊ शेतीचा नवा मार्ग

डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या (Dehydrated Fruits and Vegetables) म्हणजे नियंत्रित पद्धतीनं पाणी काढलेले पदार्थ, ज्यामुळे त्यांचा टिकाव काही महिने ते वर्षभरापर्यंत वाढतो, वाहतूक सोपी होते आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळते. भारतामध्ये दरवर्षी लाखो टन फळं व भाज्या पोस्ट-हार्वेस्ट नुकसान (post-harvest loss) म्हणून वाया जातात. जादा उत्पादनाचं योग्य साठवण नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतात आणि मोठं […]

पर्माकल्चर: शेतकऱ्यांसाठी टिकाऊ शेतीचा मार्ग

आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]

ग्रीन वॉटर म्हणजे नेमकं काय?

“पाणी म्हणजेच जीवन” हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते. पाणी फक्त नळातून, विहिरीतून किंवा धरणातून मिळणारं नसतं – ते जमिनीतही असतं, आणि झाडांमुळे वातावरणातही फिरत असतं. या लेखात आपण ग्रीन वॉटर (Green Water) म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, आणि त्याचं अचूक मोजमाप का […]