भारतात पाळीव प्राण्यांची संख्या जलद गतीने वाढते आहे. विशेषतः कुत्र्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांच्यासाठी पौष्टिक व दर्जेदार खाद्य (Dog food) घेण्याकडे मालकांचा कल वाढला आहे. पूर्वी उरलेलं अन्न देण्याची पद्धत होती, पण आता भारतातील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचा बाजार जलद वाढत असल्यामुळे आरोग्याला पूरक, सेंद्रिय (Organic food) आणि संतुलित आहार निवडणारे ग्राहक अधिकाधिक दिसू लागले आहेत. […]
डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या (Dehydrated Fruits and Vegetables) म्हणजे नियंत्रित पद्धतीनं पाणी काढलेले पदार्थ, ज्यामुळे त्यांचा टिकाव काही महिने ते वर्षभरापर्यंत वाढतो, वाहतूक सोपी होते आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळते. भारतामध्ये दरवर्षी लाखो टन फळं व भाज्या पोस्ट-हार्वेस्ट नुकसान (post-harvest loss) म्हणून वाया जातात. जादा उत्पादनाचं योग्य साठवण नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतात आणि मोठं […]
आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]
“पाणी म्हणजेच जीवन” हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते. पाणी फक्त नळातून, विहिरीतून किंवा धरणातून मिळणारं नसतं – ते जमिनीतही असतं, आणि झाडांमुळे वातावरणातही फिरत असतं. या लेखात आपण ग्रीन वॉटर (Green Water) म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, आणि त्याचं अचूक मोजमाप का […]
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण याच ग्वारापासून मिळणाऱ्या ग्वार गमचं (Guar Gum) महत्त्व खूप मोठं आहे. हा नैसर्गिक घटक जगभरच्या अन्नप्रक्रिया, औषध, सौंदर्यप्रसाधने आणि तेल उद्योगात वापरला जातो. त्यामुळे ग्वार हे केवळ शेतीचं पीक न राहता एका आंतरराष्ट्रीय उद्योगाचं केंद्रबिंदू […]
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण इथेनॉल म्हणजे नक्की काय? ते कुठून आणि कशापासून तयार होतं? आणि इथेनॉल उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर काय दर्जा आहे? या लेखातून आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हा एक प्रकारचा जैवइंधन (biofuel) […]
१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन — ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं, आणि अभिमानाने भरलेले क्षण. पण या वर्षी, सामाजिक माध्यमांवर फिरत असताना एक पोस्ट खूपच अंतर्मुख करणारी ठरली. इंटरनेट इन्फ्लुएन्सर नमान श्रीवास्तव यांनी लिहिलं होतं: “राजनीति में जाना ज़रूरी नहीं है, लेकिन राजनीति पर नज़र रखना हर नागरिक का कर्तव्य है।सिर्फ वोट देना ही लोकतंत्र नहीं […]
भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत. दोन […]
आजकाल ग्राहक अधिक आरोग्यसजग झाले आहेत. रासायनिक अन्नामुळे होणारे आजार, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, आणि GM बियाण्यांच्या दुष्परिणामांविषयी आता जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची (Organic Produce) मागणी वेगाने वाढते आहे. पण खरी चिंता हीच असते – “हे खरंच सेंद्रिय आहे का?” म्हणूनच ‘सेंद्रिय प्रमाणपत्र’ (Organic Certification) हा ग्राहक आणि विक्रेत्यांमधील विश्वासाचा दुवा बनतो. याच संदर्भात, […]
“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली. हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि […]
