भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा शेताच्या कडेला एक कडूलिंबाचं झाड असतंच. जुन्या पिढ्या म्हणायच्या — “कडूलिंबाचं पान तोंडात ठेवलं की रोग जवळ येत नाही.” आज विज्ञान सांगतंय की, त्या पानांमध्ये खरंच कीटकांपासून संरक्षण देणारे घटक असतात. आज रासायनिक कीटकनाशकांचा अति […]
शेतीत पाणी पुरवण्यासाठी- ठिबक सिंचन चालवण्यासाठी, विहिरीतील मोटार पंपासाठी आणि धान्य-भाजीपाल्याची प्रक्रिया करण्यासाठी वीजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात वीज ही शेतीच्या उत्पादनक्षमतेशी थेट जोडलेली आहे. म्हणूनच शेतीतील वीज वापर किती आहे, त्यातील आव्हाने कोणती आहेत आणि पुढे काय दिशा घ्यायला हवी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वीजविक्री आणि कृषी वीज वापर महावितरणच्या […]
भारतामध्ये दुष्काळ ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही; ती सामाजिक व आर्थिक परिणाम घडवणारी गंभीर परिस्थिती आहे. दुष्काळ आल्यास शेतकऱ्यांचं जीवन, पिकांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज भासते. म्हणूनच दुष्काळ औपचारिकपणे जाहीर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यानंतरच मदत आणि दिलासा योजना कार्यान्वित होतात. त्यामुळे दुष्काळाची व्याख्या, […]
आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण इथेनॉल म्हणजे नक्की काय? ते कुठून आणि कशापासून तयार होतं? आणि इथेनॉल उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर काय दर्जा आहे? या लेखातून आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हा एक प्रकारचा जैवइंधन (biofuel) […]
भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत. दोन […]
आजकाल ग्राहक अधिक आरोग्यसजग झाले आहेत. रासायनिक अन्नामुळे होणारे आजार, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, आणि GM बियाण्यांच्या दुष्परिणामांविषयी आता जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची (Organic Produce) मागणी वेगाने वाढते आहे. पण खरी चिंता हीच असते – “हे खरंच सेंद्रिय आहे का?” म्हणूनच ‘सेंद्रिय प्रमाणपत्र’ (Organic Certification) हा ग्राहक आणि विक्रेत्यांमधील विश्वासाचा दुवा बनतो. याच संदर्भात, […]
“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली. हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि […]
शेती करताना कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या असते. यावर उपाय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके आणि कीटकनियंत्रक (Insecticides / Pesticides) वापरत असतात. पण नेमकं कोणतं कीटकनाशक कोणत्या प्रकारचं असतं, ते कसं काम करतं, आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे , ही माहिती अनेकदा स्पष्ट नसते. या लेखात आपण कीटकनाशकांचे मुख्य दोन प्रकार […]
शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे आणि पिकांना आवश्यक पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी खतांचा वापर अपरिहार्य ठरतो. पण खतांचे प्रकार समजून घेणे आणि योग्य निवड करणे हे शाश्वत आणि लाभदायक शेतीसाठी अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण खतांचे चार मुख्य प्रकार आणि त्यांचे फायदे-तोटे सविस्तरपणे पाहणार आहोत, तसेच द्रव आणि […]
