Toll Plaza, Image Credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Toll_Plaza_on_Roads_in_India_NH_27_National_Highway_Rajasthan_NH76_%28old_system%29_in_India.jpg
पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि रांगांमध्ये थांबण्याची गरज बऱ्याच अंशी कमी झाली. गाडीच्या समोरील काचेवर चिकटवलेला आरएफआयडी टॅग आणि स्कॅन करताच बँक खात्यातून रक्कम वजा — अगदी सहज आणि जलद.
पण आता सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकतेय — जीपीएस-आधारित टोल प्रणाली. केंद्र सरकारने १ मे २०२५ पासून GPS-आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रणाली ट्रक, बस यांसारख्या व्यावसायिक वाहनांसाठी लागू केली जाणार आहे. खासगी वाहनांचा समावेश नंतरच्या टप्प्यात होणार आहे. तांत्रिक अडचणी वेळेत ओळखता याव्यात आणि सर्व वाहनधारकांसाठी बदल सुलभ व्हावा यासाठी ही टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात आहे.
म्हणजे आता ना टोल नाके, ना स्कॅनिंग — फक्त सॅटेलाइटद्वारे तुमचा प्रवास नोंदवला जाईल आणि तुमच्या बँक खात्यातून आपोआप टोलची रक्कम वजा होईल.
हे ऐकायला जरा साय-फाय वाटेल, पण हे खरं आहे!
जीपीएस यंत्रणा वाहनाचा मार्गक्रमण (प्रवासाचा मार्ग) सतत नोंदवत राहील. म्हणजे तुम्ही कुठे गेलात, किती वेळ थांबलात याची माहिती सिस्टीममध्ये संकलित होईल.
ही माहिती योग्य हातात असली तर उपयोगी, पण गैरवापर झाला तर…?
सर्व माहिती सॉफ्टवेअर आणि सॅटेलाइटद्वारे हाताळली जाणार, त्यामुळे सायबर हल्ल्यांचा धोका नाकारता येणार नाही. योग्य सुरक्षेची आवश्यकता.
जंगल, डोंगराळ भाग किंवा नेटवर्क अडथळ्यांमुळे जीपीएस सिग्नल मधे अडथळे येऊ शकतात.
सर्व गाड्यांना OBU देणं, सॅटेलाइटशी जुळवणं — यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.
या देशांनी गोपनीयतेचे योग्य कायदे आणि सायबर सुरक्षेची काटेकोर यंत्रणा राबवली आहे.
या देशांचा अनुभव लक्षात घेतला, तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर, पारदर्शकता, आणि गोपनीयतेचं संरक्षण ही या प्रणालींची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. भारतासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरू शकते, पण भारतीय खंडप्राय विस्तार, विविधता आणि डिजिटल साक्षरतेचा विचार करून अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणं आवश्यक ठरेल.
जीपीएस-आधारित टोल प्रणाली भारतासाठी एक नविन क्रांती ठरू शकते. FASTag ने सुरुवात केली होती, आता GPS द्वारे आपण पुढच्या टप्प्यावर पोहचणार आहोत. मात्र, या तंत्रज्ञानाचा उपयोग करताना नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण, गोपनीयता आणि सायबर सुरक्षितता यावर कटाक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.
“रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या आता टोल न पाहता चालतील, पण त्या कुठे जात आहेत हे नोंदले जात राहील…”
ही सोय आहे का एक नजरकैद? यावर तुम्ही काय म्हणता?
उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी… Read More
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी… Read More
ऊर्जेच्या वाढत्या गरजा, वीज दरात वाढ आणि पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक घरमालक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. भारत सरकारच्या 'प्रधानमंत्री सूर्य घर… Read More
This website uses cookies.