Soil, Image credit: https://pixabay.com/photos/soil-hand-farm-garden-fertilizer-766281/
शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे, याचा निर्णय केवळ तिच्या प्रकारावरच नाही, तर तिच्या विविध गुणधर्मांवर देखील अवलंबून असतो. योग्य मातीमध्ये पिके चांगली वाढतात, पोषणद्रव्यं सहज मिळतात, आणि जलधारणक्षमता चांगली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे गुणधर्म (Soil Properties) समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.
भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचे प्रकार व त्यांचे शेतीतील महत्त्व यावर आधारित लेख तुम्ही इथे वाचू शकता – भारतामधील मातीचे प्रकार आणि त्यांचे शेतीतील महत्त्व
या लेखात आपण मातीचे मुख्य तीन प्रकारचे गुणधर्म पाहणार आहोत: भौतिक, रासायनिक, आणि जैविक.
भौतिक गुणधर्म जसे की पोत, छिद्रता आणि जलधारण क्षमता हे ठरवतात की बीज उगम किती सहज होईल, मुळे कशी वाढतील, आणि पाणी व हवा किती सहज मातीमध्ये खेळती राहतील. मातीच्या भौतिक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –
रासायनिक गुणधर्म म्हणजेच पोषक तत्त्वांची उपलब्धता, मातीचे pH मूल्य, व सेंद्रिय कर्ब यावर पीक किती समतोल पोषण घेईल हे ठरतं. मातीच्या रासायनिक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –
जैविक गुणधर्म हे मातीतील सूक्ष्मजीव, गांडुळे आणि इतर जिवंत घटकांशी संबंधित असतात. हे घटक मातीला ‘जिवंत’ ठेवतात आणि तिची सुपीकता नैसर्गिकरीत्या वाढवतात. मातीच्या जैविक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –
| गुणधर्माचा प्रकार | सुधारण्यासाठी उपाय |
| भौतिक गुणधर्म | शेणखत, कंपोस्ट व गांडूळ खत वापरून मातीची रचना सुधारा कमीत कमी मशागत (minimum tillage)गव्हाच्या किंवा हरभऱ्याच्या काड्यांनी माती झाकणे (mulching) |
| रासायनिक गुणधर्म | माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खत व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर क्षारी/आम्ल मातीसाठी चूना किंवा सल्फर वापरा (pH संतुलनासाठी) |
| जैविक गुणधर्म | जैविक खतांचा वापर वाढवा (जैविक शेतीची तत्त्वे पाळा) सूक्ष्मजीवयुक्त द्रव्ये (जसे की जिवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क) चा वापर वाढवापीक पालट व आंतरपीक पद्धतीने जैवविविधता वाढवा – शेंगावर्गीय पिकांची आंतरपिके/पालटपिकेसेंद्रिय कार्बन वाढवणाऱ्या पद्धती (leaf litter, compost mulch इ.) वाढवा |
माती ही फक्त एक माध्यम नसून, ती आपल्या शेतीची खरी पायाभूत संपत्ती आहे. तिचे गुणधर्म समजून घेणं म्हणजे पिकांच्या गरजांनुसार योग्य निर्णय घेण्याचं शक्तिशाली साधन मिळवणं.
शेतकरी म्हणून आपल्याला या तिन्ही प्रकारांतील गुणधर्म ओळखून त्यांची संतुलित सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण हीच ती कळीची गोष्ट आहे जी जमिनीपासून उत्पादनापर्यंतचा प्रवास ठरवते.
आणि जर हे सर्व गुणधर्म समजून घ्यायचे असतील, तर माती परीक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पण त्यासाठी नमुना घेण्याची योग्य पद्धत अवलंबणं आवश्यक आहे.
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More
अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेती निर्यातदारांमध्ये मोठी चिंता होती. कारण अमेरिकेने “Reciprocal Tariff” नावाची धोरणात्मक टॅरिफ… Read More
तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात.… Read More