साबुदाणा वडा
आषाढ श्रावण आला कि सुरु होतात उपवास. आणि उपवासात साबुदाणा वापरून केलेले पदार्थ न खाणारा व्यक्ती शोधून सापडणार नाही, स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा.
उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. विशेषतः त्याची खिचडी आणि खीर तयार केली जाते. अनेकांना उपवासाच्या वेळी याचे सेवन करायला आवडते. तर असाच एक उपवासाचा पदार्थ आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे साबुदाणाचे वडे.
आता हे वडे जर दोन व्यक्तींसाठी तयार करावयाचे झालेत तर काय काय साहित्य लागेल ते बघूया!
गरमागरम साबुदाणा वडे तयार आहेत. दह्याबरोबर खायला अगदी चवदार लागतील.
साबुदाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे वजन वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले मानले जाते. साबुदाण्याचे जर तुम्ही रोज सेवन केले तर तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता. रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुमचे शरीर खूप दुबळे असेल तर तुमच्या आहारात साबुदाणा जरूर घ्या. यामुळे तुमचे शरीर फिट राहील.
साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते जे हाडांची वाढ आणि मजबूती वाढवते. याशिवाय साबुदाणा हा देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. हे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांची वाढ देखील कमी करू शकते. साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो. यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. यासोबतच मेंदूचे विकार दूर करण्यातही हे गुणकारी आहे.
आरोग्य आणि पोषण सूचना:या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.
उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी… Read More
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी… Read More
पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि… Read More
This website uses cookies.