Grapes, Image credit: https://pixabay.com/photos/grapes-vines-grapevine-vineyard-2656259/
रसायन अवशेषमुक्त शेती (Chemical residue-free agriculture) ही एक आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धती आहे, जिथे रासायनिक कीडनाशके व खते अत्यंत मर्यादित प्रमाणात वापरली जातात किंवा नैसर्गिक पर्यायांचा अवलंब केला जातो. परिणामी, शेतीमालातील रासायनिक अवशेषांचे प्रमाण नियंत्रित राहते आणि ते मान्यताप्राप्त मर्यादेपेक्षा कमी असते. ही पद्धत संपूर्ण सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ती उत्पादनक्षमतेला धक्का न लावता, जमिनीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर ठरते.
या लेखात रसायन अवशेषमुक्त शेती का महत्त्वाची आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणन प्रणालींबद्दल अधिक जाणून घेऊया.
बहुतेक पिके या पद्धतीने वाढविता येतात. उदा., टोमॅटो, बटाटा, कांदा, गहू, तूर, सोयाबीन, सफरचंद, डाळिंब, द्राक्षे, आणि हळद.
अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, विविध देशांमध्ये रासायनिक अवशेषांची कमाल मर्यादा (Maximum Residue Limit (MRLs)) निश्चित केली जाते.
भारतीय प्रमाणपत्रे:
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे:
रसायन अवशेषमुक्त शेती पूर्ण सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास, शेतकरी सेंद्रिय शेतीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली भूसंरचना सुधारू शकतात आणि उत्पन्नाचे प्रमाण कायम ठेवू शकतात. सेंद्रिय प्रमाणपत्रासाठी लागणारा संक्रमणकाळ (Transition Period) सुलभ करण्यासाठीही ही पद्धत उपयोगी ठरते.
पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात जलसंधारण आणि शाश्वत शेतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी रासायनिक इनपुट्सचा वापर मर्यादित ठेवत अधिक आरोग्यदायी आणि शाश्वत उत्पादन घेतले आहे. पाणी फाउंडेशनने ‘सत्यमेव जयते शेतकरी कप (Satyamev Jayate Farmer Cup)’ सुरू केला. शाश्वत शेतीमध्ये सर्वोत्तम काम करण्यासाठी शेतकरी गटांमध्ये आयोजित केलेली ही वार्षिक स्पर्धा आहे. ‘फार्मर कप’ चा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘एफएसएसएआय (FSSAI)’ने ठरवून दिलेल्या रासायनिक अवशेषांची कमाल मर्यादेनुसार (Maximum Residue Limit) पिकांची लागवड करणे. अनेक ‘शेतकरी गटांनी टीयूव्ही नॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या खाजगी प्रयोगशाळेत नमुने चाचणी करून घेतले आणि ते उत्तीर्ण झाले! त्यांच्या उत्पादनात कोणतेही अवशेष आढळले नाहीत. पाणी फाऊंडेशनच्या वार्षिक अहवालावर रासायनिक अवशेषमुक्त शेतीबद्दल अधिक वाचा – https://www.paanifoundation.in/wp-content/uploads/2024/12/Annual-Report-2022-Farmer-Cup-2-1.pdf
रसायन अवशेषमुक्त शेती ही भारतीय शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. पर्यावरणपूरक शेतीचा अवलंब करून शेतकरी केवळ आपल्या आरोग्याचे संरक्षण करत नाहीत, तर अधिक चांगल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा स्वीकार करून आपल्या शेतीचा विकास साधावा.
२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा… Read More
कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून… Read More
भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा… Read More
View Comments