Azim Premji, Image Credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Azim_Premji_-_World_Economic_Forum_Annual_Meeting_Davos_2009_%28crop%29.jpg
भारतातील ग्रामीण समाज अजूनही अनेक मूलभूत आव्हानांशी झगडतो आहे – अपुरं शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि असुरक्षित उत्पन्न. सरकारी योजना व धोरणं मदत करतातच, पण त्यांचा परिणाम अनेकदा धीमा किंवा अपुरा ठरतो. अशा परिस्थितीत खाजगी परोपकारी उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात.
अज़ीम प्रेमजी (Azim Premji), IT उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि विप्रो (Wipro) चे संस्थापक, यांनी स्वतःच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजकल्याणासाठी दिला. आज ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या परोपकारींपैकी एक आहेत. त्यांचं ध्येय स्पष्ट आहे — न्याय्य, समताधिष्ठित आणि शाश्वत समाजाची निर्मिती.
अज़ीम प्रेमजी फाउंडेशन (Azim Premji Foundation) ची स्थापना 2001 मध्ये झाली. सुरुवातीला उद्दिष्ट होतं – ग्रामीण व सरकारी शाळांमध्ये शिक्षण सुधारणा घडवणं. पण आज या फाउंडेशनचं काम शिक्षणाबरोबरच (Education), आरोग्य (Health), उपजीविका (Livelihood), आणि अनुदाने (Grants) या चार महत्त्वाच्या स्तंभांभोवती विस्तारलं आहे. फाउंडेशन चं काम फक्त शहरापुरतं मर्यादित नसून ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात पसरलेलं आहे, जेथे गरज सर्वात जास्त आहे.
₹3,10,000 कोटींचं दाननिधी (Endowment Fund) हे भारतातील सर्वात मोठं खाजगी परोपकारी देणगी (philanthropic endowment) मानलं जातं, ज्यामुळे फाउंडेशनचं काम दीर्घकालीन आणि शाश्वत पद्धतीने चालू राहू शकतं. या निधीतून फक्त वार्षिक व्याज व उत्पन्न (returns) शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि अनुदान यावर खर्च केला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा वापर ग्रामीण व वंचित समाजासाठी होतो, पण मूळ भांडवल कायम सुरक्षित राहतं. ही रचना अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठांच्या endowment मॉडेलसारखी असली, तरी ग्रामीण भारतासाठी काम करणाऱ्या खाजगी फाउंडेशनकडून एवढ्या प्रमाणात दाननिधी असणं खरंच बेजोड आहे.
खालील तक्त्यात गेल्या काही वर्षांत फाउंडेशनने केलेल्या एकूण खर्चाचं चित्रण दिलं आहे, जे त्यांच्या कामाची व्याप्ती आणि सातत्य दाखवतं.
Source: Azim Premji Foundation Report – June 2025
शिक्षण हे फाउंडेशनचं हृदय आहे. ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देणं, अभ्यासक्रम सुधारणा करणं आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं या गोष्टींवर ते काम करतात.
ग्रामीण व वंचित मुलींना उच्च शिक्षण मिळावं यासाठी फाउंडेशनने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
अर्ज कसा करावा?
सूचना: कोणत्याही मध्यस्थाकडे किंवा एजंटकडे पैसे देऊ नका. फाउंडेशन कधीही शिष्यवृत्तीसाठी शुल्क आकारत नाही.
2022 मध्ये फाउंडेशन ने आरोग्य क्षेत्रात प्रवेश केला. अल्पावधीत त्यांनी ग्रामीण व शहरी गरीब समाजाला लक्षात घेऊन मोठे कार्यक्रम सुरू केले.
ग्रामीण भागात आरोग्याची दुर्लक्षिता गेल्या अनेक दशकांत मोठा प्रश्न राहिला आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशन च्या या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांना थेट लाभ मिळतो आहे.
शेतकरी व आदिवासींच्या उपजीविकेवर फाउंडेशन ने 2022 पासून लक्ष केंद्रित केलं.
यामुळे शेतकरी व आदिवासींना केवळ उत्पन्न वाढ नाही तर बाजाराशी जोडणं, स्थिरता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळते.
अज़ीम प्रेमजी फाउंडेशनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच उपक्रम राबवतात आणि इतर गैर-सरकारी संस्थाना (Non-Governmental Organization – NGO ) देखील सक्षम करतात.
यामुळे छोट्या ग्रामीण संस्था सक्षम होतात, ज्यांना स्थानिक समस्यांची खरी जाण असते.
अज़ीम प्रेमजी फाउंडेशनचं काम तीन मोठ्या क्षेत्रांवर आधारित आहे — शिक्षण, आरोग्य, उपजीविका. हे तीन स्तंभ ग्रामीण भारताच्या विकासासाठी परस्परपूरक आहेत.
यामुळे ग्रामीण समाज अधिक सक्षम (resilient), आत्मनिर्भर (self-reliant), आणि शाश्वत (sustainable) बनतो आहे.
अज़ीम प्रेमजी यांचा परोपकार हा केवळ दानधर्माचा प्रकार नाही. तो ग्रामीण भारत बदलण्यासाठीची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. शिक्षण व आरोग्य यांमध्ये गुंतवणूक करून फाउंडेशन ग्रामीण समाजाला नव्या वाटा दाखवत आहे. भविष्यात अशा प्रयत्नांनी भारतातील असमानता कमी होऊन न्याय्य आणि शाश्वत समाजाची उभारणी होऊ शकते.
भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More
आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More